कुत्रा चावल्यास राज्य सरकारांना द्यावा लागणार मोबदला: सुप्रीम कोर्ट
भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टने कठोर टिप्पणी करताना म्हटले की, “जर कुत्र्याच्या चाव्यामुळे कोणाचा मृत्यू झाला किंवा लहान मुले आणि वृद्ध जखमी झाले, तर राज्य सरकारांना मोबदला द्यावा लागेल.” या मुद्द्यावर भावनिक नव्हे, तर व्यावहारिक तोडगा काढणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांच्या जबाबदारीबाबतही न्यायालयाने संकेत दिले आहेत.