ताज्या घडामोडी

सिटी कनेक्ट तक्रारींचा पूर • चोहोट्टा बाजार शिबिरात अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांची दांडी समाधान शिबिर की असमाधान; आ. सावरकरांनी विचारला जाब प्रतिनिधी | चोहोट्टा बाजार अकोट तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत (टप्पा-१) चोहोट्टा बाजार येथे आयोजित शिबिरात नागरिकांच्या तक्रारींचा पूर आला. परंतु अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने समस्यांवर अपेक्षित तोडगा निघाला नाही. त्यामुळे त्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. हे समाधान शिबिर आहे की असमाधानाचा मेळावा, असा सवाल करत ‘माझ्या मतदारसंघात काम करायचे असल्यास बदलीचे अर्ज करुन घ्या’, असा इशारा दिला. नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा त्यांच्या दारी उपलब्ध करण्यासाठी समाधान शिबिर घेण्यात येते. तक्रारींचे तत्काळ निवारण करत नागरिकांना डिजिटल ७/ १२, ८-अ उतारे, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी व जात प्रमाणपत्र, अकृषक परवानगी आदी सेवा एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात नागरिकांची प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/ १२ मधील त्रुटी, विविध प्रमाणपत्रांची कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिबिराला दांडी मारल्याने नागरिकांची गैरसोय वाढली. त्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घारेवर धरले. ‘माझ्या मतदारसंघात काम करायचे नसेल, तर बदलीचे अर्ज मतदारसंघात काम करायचे नसल्यास बदलीचे अर्ज करा आमदार सावरकर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. शिबिर पुन्हा घेणार: आ. सावरकर यांची ग्वाही शिबिरातील अव्यवस्था व प्रलंबित कामांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने आमदार रणधीर सावरकर यांनी हे शिबिर पुन्हा घेणार, अशी ग्वाही दिली. हे शिबिर अपेक्षेप्रमाणे झाले नाही, माहितीचा अभाव; नागरिकांपर्यंत पोहोचच नाही शिबिराबाबत प्रसिद्धी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गावपातळीवर दवंडी दिली नाही, माध्यमांना अधिकृत माहिती दिली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही वेळेत कळवले नाही. यामुळे अनेक करून घ्या, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही शिबिरे घेतली जातात, अधिकारी उपस्थित नसतील तर या उपक्रमांचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, शिबिरांमध्ये अधिकारी दांडी मारत असल्याने योग्य याबाबत त्यांनी शेतकरी व नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. योग्य नियोजनासह हे शिबिर पुन्हा घेण्यात येईल. शिबिरात प्रत्येक अर्जावर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली, नागरिक या शिबिराबाबत अनभिज्ञ राहिले. काहींना शेवटच्या क्षणी माहिती मिळाल्याने ते आवश्यक कागदपत्रांशिवायच उपस्थित राहिले, परिणामी त्यांची कामे होऊ शकली नाही. मार्गदर्शन मिळत नाही. तसेच कामे अडकून पडतात, अशी व्यथा नागरिकांनी मांडली. महसूल सेवेच्या सुलभतेसाठी समाधान शिबिर उपक्रम सुरू केला. परंतु चोहट्टा बाजार येथील शिबिरात प्रशासनाची कार्यक्षमता उघड नागरिकांचा आरोप, शिबिर म्हणजे दिखावा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. शिबिर म्हणजे केवळ दिखावा, असा आरोप नागरिकांनी केला. अर्ज घेतले जातात, परंतु त्यावर काहीच होत नाही. गतवर्षीही असेच झाले होते. यंदाही काहीच बदल झाला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी व उपस्थितांनी दिल्या. तक्रारींवर तोडगा नाही शिबिरात शेकडो नागरिक समस्या घेऊन उपस्थित होते. प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील चुका, जमीन नोंदणीतील विसंगती, उत्पन्न व जात प्रमाणपत्रातील विलंब, पुरवठा विभागाच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या अनुदानाशी संबंधित प्रश्नांवर नागरिकांनी व्यथा मांडली. अनेकांनी लेखी निवेदन देण्यासाठी रांगा लावल्या. तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारल्या. शिबिरात आलो तरी तीच परिस्थिती आहे. कुणी ऐकून घेणारे नाही. मग हे शिबिर कशासाठी, असा सवाल नागरिकांनी केला. वीज प्रश्न का सुटत नाहीत? जात, उत्पन्न, रेशन व इतर प्रमाणपत्रे वेळेत का मिळत नाहीत, डिजिटल सेवा असूनही नागरिकांना फेऱ्या का, आलेल्या अजर्जापैकी किती निकाली काढले, जबाबदारांवर कारवाई होणार का आदी प्रश्नांकडे लक्ष लागले आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.