गावाच्या टोकापर्यंत पाणी मग गुडधीलाच का नाही?तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प; म्हणे ४६ लाखांची जलवाहिनी टाकणार
Akola B7
गावाच्या टोकापर्यंत पाणी मग गुडधीलाच का नाही?तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प; म्हणे ४६ लाखांची जलवाहिनी टाकणार
अकोला : गुडधी उपनगरातलगतच्याटोकापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे, परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या गुडधीलाच पाणीपुरवठा का नाही?, असा प्रश्न आता येथील नागरिक विचारू लागले असून, आमचा अंत बघू नका, असा इशाराही महापालिका प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याशी संपर्क साधला असता, नवीन जलवाहिनी टाकायची आहे. त्यासाठी ४६ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.येथील महिला गेल्या तीन महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हाळ्यात पिण्याच्यापाण्यासाठी महिलांसह नागरिकांना दररोज पायपीट करावी लागत असून, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. गुडधी परिसरातील अनेक घरांना नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने नागरिकांचा आधार हापसाच्या पाण्यावर आहे. मात्र, या स्रोतांमध्येही पाणी अत्यल्प असून, उपलब्ध पाणी प्रचंड खारट असल्याने ते पिण्यास, तसेच घरगुती वापरासाठीही योग्य नाही. कपडे धुणे किंवा भांडी स्वच्छ करणेही या पाण्यामुळे कठीण झाले आहे.परिसरातील महिलांना दररोज लांब अंतरावरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक कुटुंबांना टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली असून, त्यामुळे त्यांचा अतिरिक्त आर्थिक खर्च वाढला आहे.टँकरद्वारे पाणी द्या!आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मात्र उपलब्ध खारट पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याची परिस्थिती आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी तातडीने नियमित नळ पाणीपुरवठा सुरू करावा किंवा टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.