जातपंचायतीच्या दंडाच्या रकमेवरून वाद; २०० रुपयांसाठी गेला मजुराचा जीवदोन आरोपी ताब्यात : सिरसाळा शहरातील घटना
AB7
जातपंचायतीच्या दंडाच्या रकमेवरून वाद; २०० रुपयांसाठी गेला मजुराचा जीवदोन आरोपी ताब्यात : सिरसाळा शहरातील घटना
सिरसाळा (जि. बीड) : अवघ्या २०० रुपयांच्या क्षुल्लक वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका ४० वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत घडली आहे. संजू गंगाराम उबदे (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांनाताब्यात घेतले आहे.सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत राहणारे सायलू रामलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे यांच्याशी पैशांच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सायलू आणि गंगा यांनी संजू उबदे यांना पाठीवर जोरात धक्का दिला.या धक्क्यामुळे संजू तोंडावर जमिनीवर आदळले. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत याली त्यातच त्यांचा मत्य यालादंड ठरला वादाचे मूळया हत्येच्या घटनेमागे ‘जातपंचायती’ची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणावरून सिरसाळ्यात जातपंचायत बसली होती. या पंचायतीत संबंधितांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ही दंडाची रक्कम समाजबांधवांमध्ये वाटण्यात आली होती. मात्र, या वाटणीतील आणि एकमेकांना दिलेल्या उसने पैशांच्या हिशेबावरून (अंदाजे २०० रुपये) संजू उबदे यांचा पस्तमवाड यांच्याशी वाद झाला होता.