ताज्या घडामोडी

भाजपा ही धनाजी–संताजीसारखी ताकद, विरोधकांना सतत दिसते – जयंत मसने

AB7

> *पराभव न पचल्याने विरोधकांकडून अपप्रचार; जनतेच्या निर्णयाचा अपमान सहन केला जाणार नाही*

 

भाजपा ही धनाजी–संताजीसारखी ताकद, विरोधकांना सतत दिसते – जयंत मसने

 

अकोला : लोकशाहीत जनतेने दिलेला स्पष्ट कौल मान्य न करता काँग्रेस व उबाठा सेनेचे नेते सातत्याने बिनबुडाचे व बेछूट आरोप करत आहेत. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा अपमान करणारी ही भूमिका म्हणजे पराभव न पचल्याची लक्षणे असून, अकोलेकर जनता हा अपमान कधीही सहन करणार नाही, असा कडवट इशारा भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने यांनी दिला. भाजपाचे नेते विरोधकांना धनाजी–संताजीसारखे सतत दिसत असून, पराभवामुळे हताश व नैराश्यग्रस्त झालेले काही नेते पिण्याच्या पाण्यातही भाजपा पाहत असल्याची टीका त्यांनी केली. आत्मचिंतन न करता “मेरी मुर्गी की एक टांग” या भूमिकेतून आरोप करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचे त्यांनी सांगितले.जयंत मसने यांनी सांगितले की, राजराजेश्वर नगरी अकोला येथील जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास व्यक्त करत ३८ जागांवर भाजपाला तर महायुतीचे एकूण ४१ नगरसेवक विजयी केले आहेत. असे असतानाही लोकशाहीचा व जनादेशाचा अवमान करणारे आरोप केले जात आहेत. अकोल्याच्या करप्रणाली संदर्भात सुप्रीम कोर्टात काँग्रेसने धाव घेतल्यानंतरही न्यायालयाचा निर्णय न मानता अपप्रचार करण्यात आला; तरीही जनतेने भाजपालाच सर्वाधिक जागा दिल्या, हे वास्तव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारांनी दिलेला स्पष्ट जनादेश मान्य नसल्यामुळेच अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचा आरोप करत, भाजपा ही ताकद आहे, जी धनाजी–संताजीसारखी विरोधकांना सतत दिसत राहील, असा विश्वास जयंत मसने यांनी व्यक्त केलेला आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.