बुलढाण्यात हृदयद्रावक घटना; ४ मुलांना विहिरीत ढकलून वडिलांची आत्महत्या
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावाजवळ धरण परिसरातील एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. भाले अंजन गावातील व्यक्तीने सकाळी पत्नीला माहेरी सोडल्यानंतर गावी परतताना त्याने चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. घरगुती वाद किंवा आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.