ताज्या घडामोडी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातील मातृ शक्ती सुरक्षित राहील संस्कारी राहील शिक्षित राहील तर हा समाज राष्ट्र पुढे जाऊ शकतो आणि त्यासाठी स्त्री शिक्षण व अनिरुष्ट रूढींचा विरोध करून मानवता धर्माचा प्रचार प्रसार केला श्रद्धे सोबत मानवता चा विचार अंगीकार करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य पुढे नेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आणि आज त्यांच्या द्विशताब्दी वर्ष साजरा

Akola B7

अकोला….क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातील मातृ शक्ती सुरक्षित राहील संस्कारी राहील शिक्षित राहील तर हा समाज राष्ट्र पुढे जाऊ शकतो आणि त्यासाठी स्त्री शिक्षण व अनिरुष्ट रूढींचा विरोध करून मानवता धर्माचा प्रचार प्रसार केला श्रद्धे सोबत मानवता चा विचार अंगीकार करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य पुढे नेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आणि आज त्यांच्या द्विशताब्दी वर्ष साजरा करण्याचा सौभाग्य मिळाला हा आनंददायी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

 

महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते. खासदार अनुप धोत्रे , विजय अग्रवाल जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर राजेश बेले, डॉक्टर शंकरराव वाकोडे, संजय कोरडे, उमेश जाधव गणेश लोड, मनीष गावंडे भरत चराटे, डॉक्टर अमित कावरे, प्रवीण पाटील हगवणे, रामदास लांडे, गणेश राव तायडे, विवेक भरणे ,अंबादास उमाळे, राजू उगले, शिवलाल इंगळे, माधव मानकर, छायाताई मानकर, गजानन उंबरकार, मिलिंद राऊत, संदीप गावंडे एडवोकेट कल्पना गोटफोडे, राजू वारू कार , पवन महल्ले , करण शाहू, अजय शर्मा सतीश ढगे, नितीन ताकवले प्रशांत अवचार अण्णा उबाळे आधी प्रामुख्याने उपस्थित होते.

दि शताब्दी वर्षानिमित्त महायुती सरकारने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम होणार असून कार्यकर्त्यांनी या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.

यावेळी संतोष शिवरकर जयंत मसने विजय अग्रवाल यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन, एडवोकेट देवाशिष काकड तर प्रास्ताविक गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन संजय गोटफोडे यांनी केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.