ताज्या घडामोडी

८ एप्रिलला राज्यभर आरटीओ कार्यालयांवर ऑटोरिक्षा चालकांचा मोर्चा कल्याणकारी मंडळासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात आंदोलन; सक्ती तत्काळ थांबवण्याची मागणी

Akola B7 News

८ एप्रिलला राज्यभर आरटीओ कार्यालयांवर ऑटोरिक्षा चालकांचा मोर्चा

 

कल्याणकारी मंडळासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात आंदोलन; सक्ती तत्काळ थांबवण्याची मागणी

अकोला : महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांवर बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी ऑटोरिक्षा चालक-मालकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.ऑटोरिक्षा चालकांकडून ५०० रुपये प्रवेश फी आणि ३०० रुपये वार्षिक शुल्क भरण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप चालक संघटनांकडून करण्यात आला आहे. या सक्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या चालकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.सक्तीविरोधात संतापसंघटनांच्या म्हणण्यानुसार, कल्याणकारी मंडळात नोंदणी न केल्यास परवाना नुतनीकरण, पासिंग यांसारखी कामे रोखली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. ही सक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असून तात्काळ थांबवावी, अशी मागणी कृति समितीकडून करण्यात आली आहे.शासनाकडे निवेदन, तरीही कार्यवाही नाहीया संदर्भात २३ मार्च २०२६ रोजी परिवहन मंत्री व परिवहन आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने चालकांमध्ये नाराजी वाढली आहे.राज्यभर आंदोलनाची हाकया पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयांवर एकाच दिवशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने ऑटोरिक्षा चालक व मालक सहभागी होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.कल्याणकारी मंडळ की भार?रिक्षाचालकांसाठी स्थापन करण्यात आलेले कल्याणकारी मंडळ खरोखरच चालकांच्या हितासाठी आहे की परिवहन विभागाच्या फायद्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात असून या धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी जोर धरत आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.