ताज्या घडामोडी
राज्यभरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटीचे संकट, हवामान विभागाचा अंदाज
AKola B7
राज्यभरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटीचे संकट, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असून ३० मार्चपासून पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यानुसार खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. ३१ मार्चला पावसाचा जोर किंचित कमी होईल, पण १ ते ४ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.