ताज्या घडामोडी
रेड्यांच्या टकरीवरून जालन्यात तरुणाची हत्या; १५ दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
Akola B7
रेड्यांच्या टकरीवरून जालन्यात तरुणाची हत्या; १५ दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
जालन्यातील मोतीबाग परिसरात रेड्यांच्या टकरीवरून झालेल्या वादात २८ वर्षीय रवी अशोक लाड या तरुणाची निघृण हत्या करण्यात आली. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन धारदार शस्त्राने वार केल्यामुळे रवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे रवीचे अवघ्या १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे