ताज्या घडामोडी

अकोला शहरात पाणीपुरवठा आता चौथ्या दिवशी काटेपूर्णा धरणातील पाणीसाठा घटल्याने मनपाचा निर्णय; नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Akola B7 News

अकोला शहरात पाणीपुरवठा आता चौथ्या दिवशी काटेपूर्णा धरणातील पाणीसाठा घटल्याने मनपाचा निर्णय; नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन

 

अकोला : वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठ्यात होत असलेल्या घटेमुळे अकोला शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने शहरात दोन दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा आता तीन दिवसाआड म्हणजेच चौथ्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला आहे.काटेपूर्णा प्रकल्प (महान) येथे १२ मार्च रोजी ३९.०४९ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणारे वाष्पीभवन आणि वाढती मागणी लक्षात घेता धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील ६५ एमएलडी प्लांटवरून होणारा पाणीपुरवठा चौथ्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महाजनी जलकुंभ, मोठी उमरी, गुडधी जलकुंभ, नेहरू पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगा नगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ आणि लोकमान्य नगर जलकुंभ या भागांमध्ये चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी नागरिकांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी जपून वापरावे, असेही त्यांनी सांगितले.rमनपा प्रशासनाने शहरातील नागरिकांना या बदलाची नोंद घेण्याचे आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.