ताज्या घडामोडी

गुजरात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संदीप सागळे यांचा सोनार महासंघातर्फे सत्कारविलासराव अनासाने : अकोल्याचे सुपुत्र असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान

Akola B7

गुजरात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संदीप सागळे यांचा सोनार महासंघातर्फे सत्कारविलासराव अनासाने : अकोल्याचे सुपुत्र असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान

 

अकोला, दि. ४ : भारतीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी संदीप जनार्दन सागळे यांची गुजरात राज्याचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अत्यंत शिस्तप्रिय असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संदीप सागळे यांचा संपूर्ण देशात नावलौकिक असून ते अकोल्याचे सुपुत्र असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन सोनार महासंघाचे माजी अध्यक्ष विलासराव अनासाने यांनी केले.श्री. सागळे हे अकोल्याचे सुपुत्र आहेत. श्री. सागळे हे गुजरात कॅडरचे २००७ चे आयएएस अधिकारी असून, त्यांनी अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. गुजरातमध्ये मतदार यादीची विशेष सघन सुधारणा पूर्ण झाल्यानंतर, निवडणूक आयोगाने नवीन मुख्य निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने २००७ च्या बॅचचे स्वच्छ प्रतिमेचे आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सागळे यांनी यापूर्वी अहमदाबादचे जिल्हाधिकारी, तसेच बनासकांठा आणि भरूच सारख्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. सागळे यांनी काही काळ गांधीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. १६ नोव्हेंबर १९७३ रोजी जन्मलेले संदीप सागळे हे मूळ महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने संदीप सागळे यांच्यावर दिलेली मोठी जबाबदारी यशस्वीपणे सार्थकी लावतील असा विश्वास आम्हाला असल्याचे सोनार महासंघाचे माजी अध्यक्ष विलासराव अनासाने यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अहमदाबाद येथे श्री सागळे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सोनार महासंघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनार्दन सागळे, विशाल माथने (बडोदा) यांची उपस्थिती होती.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.