ताज्या घडामोडी

पोरगं चायनीज मांजा वापरणार; पालकांवर गुन्हा नोंद होणारमुलाला पतंग, मांजा घेऊन देताना काळजी घ्या

AB7News

पोरगं चायनीज मांजा वापरणार; पालकांवर गुन्हा नोंद होणारमुलाला पतंग, मांजा घेऊन देताना काळजी घ्या

जळगाव : संक्रांतीला महिनाभर बाकी असला तरी आतापासून पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. पतंगबाजीसाठी कायद्यानुसार नायलॉन आणि चायनीज मांजा विक्री करण्यासाठी बंदी आहे. या मांजामुळे अपघात आणि कधी गंभीर घटनेची भीती असते. त्यामुळे या मांजाची विक्री करणाऱ्यांसह करणाऱ्या मुलांच्या पालकांवरही गुन्हे दाखल होऊ शकतात. वापरFIRनायलॉन व चायनीज मांजामुळे गळ्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याच्या घटना घडल्या आहेतन्यायालयाने बंदी घातलेली असतानाही अनेक व्यावसायिक या मांजाची विक्री करत असतात. गेल्या वर्षी संक्रांतीच्या काळात अशी विक्री सुरू असताना महापालिका तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी बंदी घातलेला मांजा पकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गेल्यावर्षी गंभीर दुखापतीगतवर्षी संक्रांत सणाच्या काळात शहर व परिसरात नायलॉन मांजामुळे १२ पक्षी जखमी झाले तर दोन कबूतर मृत्युमुखी पडले. तसेच पिंप्राळा परिसरातील एका बालिकेच्या पायाची नस कापली गेली होती. याशिवाय एका मुलाचा पंजा कापण्यासह अन्य चारजणांना दुखापत झाली होती.शहरात पतंगबाजी सुरूसंक्रांती सणाला महिना बाकी आहे. असे असले तरी आतापासून पतंगबाजीला सुरुवात झाली आहे.माहिती, तक्रार कुठे द्याल?हा मांजा गाय बगळा, कावळे, घुबड, कबुतर यांच्यासाठी अधिक घातक आहे.या मांजाविषयी महापालिका आरोग्य विभाग अथवा त्या त्या परिसरातील पोलिस ठाण्यात तक्रार देता येऊ शकते.. तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हानायलॉन आणि चायनीज मांजा विक्री, वापरातून कोणाचा मृत्यू झाल्यास संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.चायनीज, नायलॉन मांजावर बंदीनायलॉन, चायनीज मांजा तुटत नसल्याने किंवा नष्ट होत नसल्याने तो घातक ठरतो. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी बळी पडतात किंवा गंभीर जखमी होतात तर वाहनधारक, पादचारी व्यक्तींचा मृत्यू तसेच गंभीर जखमी होतात. त्यामुळे नायलॉन मांजा निर्मिती, साठा व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.