30 जानेवारी पर्यंत मागण्या मान्य न झाल्यासनरनाळा महोत्सवात आम्ही किल्ल्यावरून उड्या घेणारहजारो शेतकरी बांधव व लाडक्या बहिणींची आर्त हाक
AB7
30 जानेवारी पर्यंत मागण्या मान्य न झाल्यासनरनाळा महोत्सवात आम्ही किल्ल्यावरून उड्या घेणारहजारो शेतकरी बांधव व लाडक्या बहिणींची आर्त हाक
अकोला: संपूर्ण जिल्ह्यात आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर यांनी ‘मानव प्रजाती वाचवा’ आंदोलन सुरू आहे. येणाऱ्या ३० जानेवारी ला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिलेला असून प्रशासन व वन्यविभाग मात्र ३० जानेवारी ला होणाऱ्या नरनाळा महोत्सवात मग्न आहे. एकीकडे ग्रामीण भागात हिंसक वन्यप्राणी नागरी वस्तीत धुमाकूळ घालत आहेत.
अकोट व तेल्हारा तालुक्याच्या ग्रामीण परिसरात हिंसक प्रवृत्ती च्या प्राण्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. रात्री शेतकरी शेतात गेले नाहीत
तर डुक्कर, हरीण, नीलगाय, रोही, शेती पिकांचे नुकसान करीत आहेत. व गेल्यास वाघ, बिबट, अस्वल शेतकऱ्यांवर हमले करीत आहेत. इतकी भयानक परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे. रात्री शेतात पिकांना पाणी देण्याकरिता एक मजूर तर त्याच्या संरक्षण करिता पाच माणसे लागत आहेत. आता मजुर मिळणे कठीण झाले असून रात्री वन्यप्राणी रहिवाशी वस्तीत येत आहेत. परंतु गंभीर विषय असून सुद्धा प्रशासनाकडे वेळ नसल्याने ग्रामीण भागात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. मुख्य प्रश्नाकडे प्रशासन व वन्यविभाग दुर्लक्ष करून नरनाळा उत्सव साजरा करीत आहे. आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर आणि वन्य विभाग व प्रशासन यांच्यात
दिनांक २९ जानेवारी पर्यंत तोडगा न निघाल्यास आम्ही नरनाळा महोत्सवात किल्ल्यावरून उड्या मारण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनात तुन देण्यात आला आहे. यावेळी सौ छाया धुळे, 3, सौ सौ माधुरी माधुरी खिरोडक खिरोडकार, सौ चंद्रकला रेळे, सौ आशा नेमाडे, सौ माधुरी बोबटकार, सौ नीता छूटे, सौ विशाखा कौठकर, सौ गोदावरी इंगळे, प्रिया देऊळकार, सौ किरण रेळे, प्रणिता मसुरकार, सौ चंचल इंगळे, दिनेश गिहें, मनीष निमकर्डे, मोहन खिरोडकार, निलेश नेमाडे, रवींद्र भोपळे, जीवन नेमाडे, रवींद्र भोपळे, अमोल मसुरकार, विनोद धुळे, अफजल भास्कर, अनिल कौठकर, गोपाल निमकर्डे व इतर शेतकरी उपस्थित होते.