विषयुक्त भात खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू, नागपुरातील धक्कादायक घटना
नागपूरच्या :-बहादुरा रोडवरील मानवशक्ती सोसायटीत विषयुक्त भात खाल्ल्याने १७ वर्षीय माही उमाळे या मुलीचा मृत्यू झाला. मृतक माहीने २० डिसेंबर रोजी अनावधानाने तांदूळ न निवडता शिजवल्याने डब्यातील कीड प्रतिबंधक गोळी अन्नात मिसळली गेली, हा विषयुक्त भात खाल्ल्याने माहीची प्रकृती खालावली. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. किरकोळ चुकीने तरुण मुलीचा जीव गेल्याने उमाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.