अकाली पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नुकसान झाले आहे विज वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच भाजीपाला फळेयांची फार मोठ्या नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली
Akola B7 News
अकोला :-अकाली पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नुकसान झाले आहे विज वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच भाजीपाला फळेयांची फार मोठ्या नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेऊन विज वितरण कंपनी, महसूल विभाग तसेच आरोग्य विभाग बांधकाम विभाग जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेला सूचना देऊन यासंदर्भात सर्वे तसेच नागरिकांना उन्हाळ्यात त्रास होऊ नये यासंदर्भात दखल घ्यावी अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री एडवोकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.
अचानक पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात सर्व शासकीय यंत्रणेने सजग राहून नागरिकांना त्रास होता कामा नये यासाठी तातडीने कामाला लागा अशा सूचना भाजप लोकप्रतिनिधी दिले आहे तसेच अनेक ठिकाणी वीज सोडल्यामुळे वाऱ्यामुळे हवा पाणी मुळे पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळ भाजीपाला तसेच पिकांची नुकसान झाले आहे त्याचे सुद्धा त्वरित पंचनामे सर्वे करण्यात यावे वीज, वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित झालाय त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक पथक निर्माण करून तातडीने कामाला लागावे अशा सूचना पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर यांनी दिले आहे यासंदर्भात खासदार अनुप धोत्रे आणि आमदार सावरकर यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी तसेच लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवरांची शेतकऱ्यांची ग्रामस्थांची भ्रमणध्वनीवर चर्चा करून झालेले नुकसान अडचणी समजून घेतल्या आहे व त्या दिशेने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काल सूचना दिल्या आहे