- राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, ‘शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी आधीच निर्णय घेतलेला आहे. सध्या माहिती संकलनाचे काम सुरू असून, एप्रिलपूर्वी माहिती उपलब्ध होणार आहे. परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन केली आहे. या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय होईल.’