वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णयजुन्नर भागात दहशत माजवणारे पन्नास बिबटे गुजरातला जाणार
AB7News
वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णयजुन्नर भागात दहशत माजवणारे पन्नास बिबटे गुजरातला जाणार
सोलापूर:-जिल्ह्यातील जुन्नर परिसरात विट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली दहशत आणि नागरिकांचा संताप लक्षात घेता, केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. जुन्नर वन विभागाच्या माणिकडोह बचाव केंद्रातील ५० बिबटे आता गुजरातच्या जामनगर येथील पुनर्वसन केंद्रात हलवले जाणार आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) या स्थलांतरासाठी शुक्रवारी (१९ डिसेंबर) अंतिम मंजुरी दिली आहे. वाढत्या हल्ल्यांचा संदर्भ… गेल्या काही महिन्यांपासून जुन्नर, आंबेगाव
आणि शिरूर तालुक्यात बिबट्या-मानव संघर्षाने टोक गाठले आहे. या भागात बिबट्यांच्या हल्ल्यात निष्पाप बालकांचे बळी गेले आहेत. शेतकरी आणि महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सप्टेंबरपासून या परिसरात मानव-बिबट्या संघर्षांची तीव्रता वाढली. कुमशेत, पिंपरखेड येथे लहान मुलांवरील हल्ल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले होते. मागील दीड दोन महिन्यांत जुन्नर वन विभागाने तब्बल ७५ बिबटे पकडून माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवले आहेत. त्यामुळे आता लवकरच ५० बिबटे हे हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमींच्या उपचारांचा खर्च वन विभाग करणार
मुंबई:-मीरा भाईंदर येथील पारिजात इमारतीत घुसलेल्या बिबट्याने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात सात नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची दखल घेत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी लोकवस्तीला भेट देऊन पाहणी केली. यापुढे बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी रुग्णांच्या उपचारांचा खर्च शासन
करेल, अशी घोषणा वनमंत्र्यांनी केली. या वेळी वनमंत्र्यांकडून पाच जख