राजकीय

“छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा…”, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले

आता विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला.

महाराष्ट्रातील विधानसभेची आगामी निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात मतदारांना विविध आश्वासने दिली जात आहेत. नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यात मनसेने महिला, तरुण, आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर भर दिला आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा विद्यामंदीर बांधा आणि गडकिल्ले सुधारा, अशा शब्दात राज ठाकरेंनी सुनावले.

शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. महाविकासआघाडीचे सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधू, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो. त्याच मोठ्या आवाजात आम्ही जय शिवराय म्हणणार. जय शिवराय हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. दुसरा कोणता राजा पृथ्वीवर असा झाला नाही. आज 400 वर्षांनंतर जय भवानी म्हटले तरी मुर्दाही उठून जय शिवाजी म्हणले असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याच मुद्द्यांवर टीका केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे जाहीरनाम्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभं करणार असे सांगत आहेत. मला वाटतं त्यापेक्षा विद्या मंदिरं उभं करणं गरजेचं आहे. गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे. मला वाटतं काही गल्लत होतं. चौका चौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, असे राज ठाकरेंनी म्हटले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.