ताज्या घडामोडी

खोपोलीत नगरसेविकेच्या नवऱ्याचा खून, मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना घडली घटना

AB7

खोपोलीत नगरसेविकेच्या नवऱ्याचा खून, मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना घडली घटना

रायगडमधील खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचा नवरा मंगेश यांचा अज्ञात इसमांनी खून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश हे आज सकाळी मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरुन घराकडे परतत होते. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या संशयास्पद चारचाकी गाडीतून आलेल्या ३ ते ४ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करत त्यांचा खून केला.

बीडमध्ये जुन्या वादाचा राग मनात धरुन पत्नीने केला पतीचा खून, नागरिकांमध्ये खळबळ

शिरुर ताजबंद (ता. अहमदपूर, जि. बीड) गावात पत्नीने पतीचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित पती प्रशांत गायकवाड (३६) दारुच्या नशेत असताना जुन्या वादाचा राग मनात धरुन पत्नी अर्चनाने त्याचे डोके भिंतीवर आपटले आणि नंतर दोरीच्या साहाय्याने गळा आवळून त्याचा खून केला. दरम्यान, घटनेनंतर अर्चनाने प्रशांत बेशुद्ध पडल्याचे सांगत दीर प्रवीण गायकवाड यांना फोन करुन घरी बोलावले होते.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डॉक्टर बायकोशी पटेनासे झालं, पुण्यात २४ तासात घेतला घटस्फोट

लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून सुरू झालेल्या वादामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अवघ्या ८ दिवसांत एका दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. पती एका जहाजावर मोठ्या पदावर कार्यरत असून पत्नी व्यवसायाने डॉक्टर आहे. या दोघांनी १८ महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता मात्र वाद होत असल्याने लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.