क्रीडा व मनोरंजन

Sachin Tendulkar : टीम इंडियाच्या पराभवामुळे सचिनही निराश, 3 सवाल विचारत म्हणाला…

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 3-0 असा झालेला थेट पराभव सगळ्यांच्याच जिव्हारी लागला आहे. न्यूझीलंडने भारताला लोळवत हा मालिका विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघावर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे. याचदरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या परभावर प्रतिक्रिया देत काही सवाल उपस्थित केले आहेत.

घरच्या मैदानावरच न्यूझीलंडने भारतीय संघाला अक्षरश: धूळ चारली आहे. तीन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडच्या संघाने लीलया खिशात घालत भारताला लोळवलं. हा पराभव फक्त खेळाडूंच्याच नव्हे तर भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या जिव्हारी लागला आहे. याचदरम्यान गॉड ऑफ क्रिकेट नावाने ओळखला जाणारा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. भारतीय खेळाडूंनी लोटांगण घातल्यानंतर सचिनने सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तीन सामन्यांची ही मालिका गमावल्यानंतर सचिनने काही सवालगही उपस्थित केले आहेत. मात्र त्याचवेळी त्याने शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांचे कौतुकही केले. इतर खेळाडू नांग्या टाकत असताना या दोघांनी बाजू सावरण्याचा पूरेपूर प्रयत्न केला होता.

भारताच्या कसोटी मालिका पराभवानंतर सचिनने X या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘ घरच्या मैदानावर 3-0 ने झालेला पराभव पचवणे खूपच कठीण आहे. आणि याचसाठी ( पराभवासाठी) आत्मपरीक्षण करणेही खूप महत्वाचे आहे. (खेळाडूंची) तयारी कमी झाली का ? खराब शॉट सिलेक्ट केले का ? की मॅच प्रॅक्टिस कमी पडली ?’ असे 3 महत्वाचे सवाल सचिनने या पोस्टमधून विचारले आहेत.

 

मात्र त्याचवेळी त्याने शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या खेळीचे कौतुक केलं. शुभमन गिलने पहिल्या डावात 90 धावा केल्या तर पंतने दोन्ही डावात अर्धशतक फटकावलं. त्या दोघांच्याही खेळीचं सचिनने कौतुक केलं. ‘शुभमन गिलने पहिल्या डावात लवचिकता दाखवली आणि ऋषभ पंतने दोन्ही डावात चमकदार कामगिरी केली. आव्हानात्मक परिस्थितीतही त्याच्या फूटवर्कने कमाल केली. तो खरोखरचं हुशारीने खेळला ’ अशा शब्दांत सचिनने त्याची पाठ थोपटली.

याच ट्विटमध्ये सचिनने न्युझीलंडच्या संघाला विजयाबद्दल शुभेच्छा देत त्यांचे कौतुकही केलं. ‘ संपूर्ण सीरिजमध्ये चांगला खेळ करण्याचे श्रेय न्युझीलंडच्या संघाला जातं. भारतात येऊन 3-0 ने मालिका जिंकणं हे खरोखरंच उत्तम आहे’ असं सचिनने नमूद केलं.

न्यूझीलंडने (आत्तापर्यंत) प्रथमच भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. एवढंच नव्हे तर एखाद्या संघाने भारतात येऊन त्याच संघाला घरच्या मैदानावर 3-0ने पराभूत करण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोणत्याच संघाला अशी कामगिरी जमली नव्हती. न्युझीलंडने बऱ्याच वर्षानंतर भारतात कसोटी सामना जिंकला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.