क्रीडा व मनोरंजनदेश विदेश

Test Cricket : 1 मालिका, 3 सामने आणि 16 खेळाडू, कसोटी मालिकेसाठी टीम जाहीर

Test Cricket : निवड समितीने आगामी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. निवड समितीने एकूण 16 खेळाडूंची निवड केली आहे.

पाकिस्तानने शान मसूद याच्या नेतृत्वात मायदेशात झालेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर विजय मिळवला. इंग्लंडने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर निवड समितीने दुसऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल केला आणि चमत्कार झाला. पाकिस्तानने सलग दोन्ही सामने जिंकत मालिकवेर नाव कोरलं. पाकिस्तानने 2-1 ने मालिका विजय मिळवला. पाकिस्तानने यासह 3 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकली. पाकिस्तान विरुद्ध मालिका गमावल्यानंतर आता इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध पुढील टेस्ट सीरिज खेळणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे.

बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. निवड समितीने पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेतील खेळाडूंवरच विश्वास दाखवला आहे. मात्र फक्त 1 बदल केला आहे.जेकब बेथेल याचा समावेश केला आहे. तर विकेटकीपर बॅट्समन जेमी स्मिथ याच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे जेमी स्मिथचा न्यूझीलंड दौऱ्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे जॉर्डन कॉक्स याचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेला 28 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा ख्राइस्टचर्च येथे होणार आहे. दुसरा सामना हा 6 डिसेंबरपासून वेलिंग्टन येथे होईल. तर तिसरा आणि अंतिम सामना 14 डिसेंबरपासून हॅमिल्टन येथे पार पडेल. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने फार महत्त्वाची असणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.