राजकीय

परिवाराने साथ सोडल्यानंतर अजित पवारांसाठी बहीण निवडणूक मैदानात, थेट म्हणाल्या…

अजित पवार जेव्हा, जेव्हा मला नमस्कार करतात, तेव्हा तेव्हा मी त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्यांना एक दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचे मला पाहायचे आहे. त्यांच्यात ती पात्रता आणि गुणही आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होतील.

बारामती  मतदार संघातून अजित पवार निवडणूक मैदानात उतरले आहे. त्याचवेळी त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. त्यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार याला निवडणूक मैदानात उतरवले आहे. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत कुटुंबातील कोणीही नाही. परंतु त्यांच्या सावत्र बहीण रजनी इंदुलकर प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी एक दिवस अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे.

अजित पवार नुसता बारामतीचा नेता नाही. ते महाराष्ट्राचे नेते आहे. त्यांचे राज्यात नाही तर देशभरात नाव आहे. त्यांच्यासाठी माझा जीव तुटला. त्यामुळे मी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडले. अजित पवार कोणतीही गोष्टी किंवा काम करतात ते सर्वोत्तम करतात. ते खूप मेहनत करतात. सध्याची परिस्थिती पाहून त्यांना वाटत असेल या लोकांसाठी मी दिवस रात्र झटलो. पहाटेपासून रात्रीपर्यंत काम केले. कुटुंबाची पर्वा केला नाही. परंतु आज मला मते मागण्याची वेळ येत आहे. हे दुर्देव आहे.

अजित पवार जेव्हा, जेव्हा मला नमस्कार करतात, तेव्हा तेव्हा मी त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्यांना एक दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचे मला पाहायचे आहे. त्यांच्यात ती पात्रता आणि गुणही आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी माझी अपेक्षा आहे, असे रजनी इंदुलकर यांनी म्हटले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.