महाराष्ट्रराजकीय

एका झटक्यात ७० हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी…शरद पवार यांनी सांगितला तो किस्सा

सरकारने लोकप्रिय योजना काढल्या आहे. परंतु या योजना निवडणुकीसाठी आहे. मतदान संपल्यावर या योजना बंद होणार आहे. लाडकी बहीण, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना बंद होणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

शेतकरी देशातील अन्नाची गरज भागवू शकतो. सध्या शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आहे. कापूस, सोयाबीनचे दर पडले. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची दुःखद बातमी आली होती. त्यामुळे मी मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो. त्यांना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे किती आवश्यक आहे, ते सांगितले. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना ७० हजार कोटी रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष  यांनी सांगितले. वर्धा येथील हिंगणघाटमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

आता विधानसभेची निवडणूक ही लोकांचे प्रश्न काय, त्यांची सोडवणूक करण्यासाठी आहे. सहा महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. तेव्हा वर्धा येथे आमचा उमेदवार निवडून देण्याचे काम तुम्ही केले. त्यावेळी देशात सत्ता बदलेले, अशी आमची अपेक्षा होती. कारण देशाने गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारचे काम पाहिले.  यांनी या दहा वर्षांच्या काळात लोकांचे प्रश्न सोडवले नाही. आज पुन्हा त्यांच्या हातात सत्ता गेली. पण आत्ताची स्थिती वेगळी आहे. लोकांनी त्यांना मतदान केले. पण ते स्वत:च्या ताकदीवर सत्तेत येऊ शकले नाही

नरेंद्र मोदी यांच्या हातात सत्ता आहे. त्याचा वापर कसा केला, देशात ११५ कोटी लोकांसाठी धोरणं करण्याची आवश्यकता आहे. उद्याच्या निवडणूकमधून आता निकाल द्यायचा आहे. कारण शेतकऱ्यांना लागणारी खतं, औषधं महाग झाली. शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. पण शेतमालास भाव नाही.

सरकारने लोकप्रिय योजना काढल्या आहे. परंतु या योजना निवडणुकीसाठी आहे. संपल्यावर या योजना बंद होणार आहे. लाडकी बहीण, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना बंद होणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. देशपातळीवर आम्ही लोकांना एकत्र आणले. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आम्ही एकत्र आलो आहे. महायुतीची सत्ता यांच्या हातून घालवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली आहे.

पाच गोष्टीची गॅरंटी आम्ही जाहीर केली आहे. महिलांना ३००० हजार, एसटी महिलांसाठी मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ, जातीय जनगणना, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा आम्ही हटवू. बेरोजगारांना महिन्याला ४००० रुपये गॅरंटी जाहीर केली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.