देश विदेश

पाकिस्तानची झोप उडाली, तालिबानी संरक्षणमंत्र्यास भेटले भारतीय अधिकारी, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांची खेळी काय?

दीड महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने काबूलमधून आपला विशेष प्रतिनिधी माघारी बोलवला होता. तसेच दोन्ही देशांच्या सीमेवर अनेकदा चकमकी आणि गोळीबार होत असतो.

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार येण्यापूर्वी चांगले संबंध होते. त्यानंतर भारताने सावधपणे पावले उचलली. परंतु आता तालिबान सरकार भारतासोबत जुळवून घेत आहे. त्यामुळे भारतीय पराराष्ट्र मंत्रायलाने तालिबान सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबान सरकार आल्यानंतर प्रथमच भारतीय पराराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी तालिबान सरकारमधील संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाकिस्तानची मात्र झोप उडाली आहे.

परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जे.पी. सिंग यांनी  तालिबानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद यांच्याशी प्रथमच भेट घेतली. याकूब हे 1996 ते 2001 पर्यंत तालिबान गटाचा माजी सर्वोच्च नेता आणि अफगाणिस्तानचा अमीर मुल्ला उमर यांचा मुलगा आहे.जे. पी. सिंग हे परराष्ट्र मंत्रालयात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण प्रकरणांचे प्रभारी आहेत.

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानचे सरकार अफगाणिस्तानमध्ये आले.काबूलचा ताबा घेतला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध दूरावले होते. परंतु आता भारताला अफगाणिस्तानशी संबंध पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळेच भारतीय अधिकाऱ्याने तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी आणि अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांचीही भेट घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सूचनेनुसार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे एक शिष्टमंडळही त्यांच्यासोबत गेले आहे. तालिबान राजवट आल्यानंतर मोदी सरकार अफगाणिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये पूर्ण प्रगती करत असल्याचे यावरून दिसून येते.

भारत आणि अफगाणिस्तानमधील नात्यांमुळे आता  पाकिस्तानची झोपच उडली आहे. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचेमधील नाते चांगले नाही. दीड महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने काबूलमधून आपला विशेष प्रतिनिधी माघारी बोलवला होता. तसेच दोन्ही देशांच्या सीमेवर अनेकदा चकमकी आणि गोळीबार होत असतो. भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध सुधारण्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशी भीती आता पाकिस्तानला वाटत आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.