क्राईम स्टोरी

भाऊबीजेला दोघी बहिणी आनंदाने घरी गेल्या पण…

भाऊबीजेचा सण भावा-बहिणींच्या प्रेमाचा, अतिशय खास असा दिवस असतो. भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणी प्रार्थना करतात, तर भाऊ हे बहिणीच्या सुखासाठी, सुखी संसारासाठी देवापुढे डोकं टेकून प्रार्थना करतात. मात्प याच पवित्र सणाच्या दिवशी एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झाला तर ?

देशभरात दिवाळी  उत्साहाने,  आनंदाने साजरी झाली. काल दिवाळीचा शेवटचा दिवस, भाऊबीजेचा सणही उत्साहात , प्रेमाने साजरा झाला. भावा-बहिणीच्या प्रेमाचा हा सण लोक आनंदाने साजरा करतात. मात्र याच सणाला गालबोट लावणारी एक भयानक घटना घडली ज्यामुळे एकच गदारोळ माजला. जिथे आनंद होता, हसण्याचे आवाज येत होते, तीच जागा क्षणभरात दु:खाने झाकोळून गेली, तिथे अश्रूंचा महापूर आला. असं नेमकं काय घडलं ? ज्या बहिणी आपल्या भावाच्या घरी त्याच्या सुखी आयुष्याची प्रार्थना करायला आल्या होत्या, त्याच बहिणींच आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यांचं कुंकूच पुसलं गेलं. दिल्लीत भाऊबीजेसाठी दोन बहिणी भावाच्या घरी आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या पतींमध्ये काही कारणावरून वाद झाला. काही वेळातच पिस्तुलातून गोळीबार झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील खजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयानक घटना घडली. भाऊबीजेच्या दिवशी पत्नीसह सासरच्या घरी गेलेल्या दोन मेव्हण्यांचे व्यवसायावरून भांडण झाले. मात्र तो वाद बघता बघता वाढला आणि त्यातच एका व्यक्तीने आपल्या मेहुणीच्या नवऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. संध्याकाळी 6.20 वाजता खजुरी खास पोलीस स्टेशन परिसरात गोळीबाराच्या घटनेबाबत फोन आला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक सोनिया विहारच्या पहिल्या पुस्ता ए ब्लॉकमध्ये घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटू हा भाड्याच्या घरात राहतो. रविवारी भाऊबीजेच्या निमित्ताने त्याच्या दोन बहिणी रेखा आणि चांदनी या त्यांचे पती अजय आणि हेमंतसोबत त्याला भेटायला आल्या. अजय आणि हेमंत हार बनवण्याचा एकच व्यवसाय करतात. मात्र सासरी पोहोचल्यानंतर अजय आणि हेमंत यांच्यात व्यवसायातील काही मुद्यावरून वाद सुरू झाला. बघता बघता तो वाद वाढला आणि रागावलेल्या अजयने हेमंतवर गोळीबार केला. त्यानंतर तो तेथून फरार झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या हेमंतला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.