महाराष्ट्रराजकीय

पाडव्याला गोविंद बागेत का गेले नाहीत? अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं..

यंदा बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. तर अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये साजरा केला.

यंदा बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. तर अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. यापूर्वी दिवाळी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत होतं. मात्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजही पवार कुटुंब एकत्र येणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र यावेळी अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये तर शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. यावेळी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची भेट घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं.आता यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आज काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते. त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज अनेक लाडक्या बहिणी भेटण्यासाठी आल्या. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी भेट घेतली. माझे जे जुने पत्रकार मित्र आहे, त्यांना आठवत असेल पूर्वी काटेवाडीमध्येच पाडवा साजरा व्होत होता. पाडव्याच्या दिवशी काटेवाडीमध्ये कार्यकर्ते साहेबांना भेटण्यासाठी येत होते. त्यानंतर पुढे गोविंद बागेची जागा घेतली. बारामतीमधील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सोप आणि सोईचं पडतं म्हणून त्यानंतर पाडवा हा गोविंद बागेतच साजरा व्हायला लागला. आजही भेटणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी खूप होती. लोकांनाही घरी जायची घाई असते, सण साजरा करायचा असतो. त्यामुळे गर्दी विभागली जावी, कार्यकर्त्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही. काटेवाडीतच पाडवा साजरा केला. ज्या कार्यकर्त्यांना साहेबांना भेटायचं होतं ते त्यांना भेटले. ज्यांना मला भेटायचं होतं ते मला भेटले त्यामुळे गर्दी विभागली गेली अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला.यावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या पूर्वी संपूर्ण कुटुंब गोविंद बागेत पाडवा साजरा करायचं मात्र आता तो दोन ठिकाणी करण्यात आला, यामुळे आपण अस्वस्थ आहोत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की अजित पवार यांना कदाचित वेळ मिळाला नसेल म्हणून ते भेटायला आले नसतील.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.