महाराष्ट्र

भर उन्हाळ्यात सहन करावा लागणार खिळखिळ्या एसटी बसचा ताप !राज्य परिवहन महामंडळ : ७६ बसनी ओलांडली कालमर्यादा

AB7

भर उन्हाळ्यात सहन करावा लागणार खिळखिळ्या एसटी बसचा ताप !राज्य परिवहन महामंडळ : ७६ बसनी ओलांडली कालमर्यादा

 

अमरावती : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नव्या एसटी गाड्यांनी अमरावतीकरांना हुलकावणी दिली आहे. अलीकडे एकही नवीन बसगाडी जिल्ह्यातील आगारास मिळाली नाही.उपलब्ध गाड्चा सातत्याने ब्रेकडाऊन होत आहेत. सध्या आगारात असलेल्या ३३२ बसपैकी १३ व १४ वर्षांचा कार्यकाल ओलांडलेल्या ७६ एसटी बस आहेत. नागपूर आगारामध्ये नव्या एसटी बस दाखल झाल्या. मात्र, अमरावतीसह विभागातील आगारांना त्यांची प्रतीक्षा आहे. अमरावती शहर हे विभागाचे मुख्यालय असल्याने या ठिकाणाहून अनेक लांब, मध्यम आणि जिल्हांतर्गत एसटी बसच्या फेऱ्या सोडल्या जातात. या आगारातील बहुतांश वाहनांनी सहा ते दहा लाख किलोमीटरचा टप्पा पार केला आहे, हे विशेषउन्हाळ्यामध्ये उत्पन्नवाढीवर भरसणासुदीव्यतिरिक उन्हाळा सुटीत व लग्नसराईत एसटीत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे यंदा उन्हाळ्यामध्ये उत्पन्न वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. खिळखिळ्या बसेसमुळे मात्र मर्यादा आहेत.४३ बसेसनी कार्यकाल ओलांडल्याची माहिती आहे.प्रवासी भंगार गाड्यांना कंटाळलेपरिणामी, सध्या उपलब्ध असलेल्या बसेसची संख्या अपुरी आहे. अमरावती विभागासाठी नव्याने १५० हून अधिक बसची गरज आहे. मात्र, ती मागणी केवळ कागदावरच आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी नव्याने बस दाखल होतील, असे विभागाचे अधिकारी सांगत होते. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही.66जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांत नव्याने बस मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमरावती विभागाकरिता नवीन बसची मागणी केलेली आहे. नवीन बस येत्या एप्रिल महिन्यापर्यंत मिळण्यासाठी शक्यता आहे.- विभागीय नियंत्रकएसटी महामंडळाकडे जुन्या गाड्यांपैकी आजघडीला १३ वर्षे झालेल्या ३३ आणि १४ वर्षांची काल

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.