ताज्या घडामोडी

अकोल्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाला गळती लागली आहे.

अकोल्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळती; एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश

अकोल्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाला गळती लागली आहे.अकोल्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आता मशालला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला आहे.अकोला  नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष स्वतःपुरता मर्यादित केला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्वाची पद दिली जात नसून, निष्क्रिय लोकांच्या खांद्यावर पक्ष वाढविण्याची जबाबदारी दिली जात असल्याचा आरोप करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.जिल्ह्यातील नेते सर्व प्रमुख पदे स्वतःकडेच ठेवून इतर कार्यकर्त्यांना पुढे जाण्याची संधी देत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. यामुळे सर्व निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचं ऊबाठाचे जिल्हासंघटक डॉ.विजय दुतोंडे यांनी म्हंटल आहे.मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर जिल्ह्यातील आणखीही काही उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा आगमी काळात त्यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या सोबत जुळणार आल्याचंही विजय दुतोंडे म्हणाले.शिवसेना ( एकनाथ शिंदे ) मध्ये प्रवेश घेणारे पदाधिकाऱ्यांची नावे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असतानाची पदडॉक्टर विजय दुतोंडे – जिल्हासंघटकदेवश्री ठाकरे – महिला जिल्हा संघटक व माजी नगरसेवकारेखा राऊत – उपजिल्हा संघटक, जिल्हा परिषद सदस्यगजानन बोराळे – उपजिल्हाप्रमुखअविनाश मोरे – शहर सचिव बोबडे- जिल्हा परिषद सदस्य

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.