राजकीय

विधानसभेपूर्वी राणेंची मोठी खेळी; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ!

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानासाठी आता अवघे पाच ते सहा दिवस बाकी आहेत. प्रचारानं देखील जोर पकडला आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.ऐन विधानसा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यानं उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेनंतर सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर ठाकरे गटाच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे .ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केलाय. नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत तर जे चुकीचं कार्य करत आहेत, ज्या कारवाया होत आहेत आणि जे अतिक्रमण सुरु आहे त्याविरोधात नितेश राणे आहेत. कोकणातील मुस्लिम समाजाच्या लोकांना सर्वात जास्त आधार हा राणेंनी दिलाय त्यामुळे मुस्लिम समाज बहुसंख्येने नितेश राणे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रज्जब रमदुल यांनी दिली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.