ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

AB7

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

रिसोड, सध्याच्या परिस्थितीत महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहेत. नुकतेच पुणे येथील स्वारगेट येथे शिवशाही बस मध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाची शाई वळत नाही तेच रिसोड मध्ये एका अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान घडली. सदर प्रकरणी पीडिता आपल्या परिवारासह रिसोड बोलीस स्टेशन मध्ये संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान पोहचली. मात्र रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल केली नव्हती तर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे रिसोड पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. पोलिसांच्या या कार्यशैलीमुळे पोलिसांना घटनेचे गांभीर्य समजत नसल्याचे दिसते. तुझ्या मामाने तुला बोलावले असे सांगून एका व्यक्तीने शहरातील एका शाळकरी विद्यार्थिनीला आटोत बसवून रिसोड वाशिम मार्गावर एका निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना २७फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोनवाजताच्या दरम्यान घडली. लैंगिक अत्याचार करून सदर मुलीला त्याच ठिकाणी सोडून सदर व्यक्ति तिथून पसार झाला. घटनेची हकीकत ही पिडीतेने आपल्या आई-वडिलांना सांगितली. वडिलांसह सदर पीडीता रिसोड पोलीस स्टेशनला येऊन घटनेची सविस्तर माहिती ‘रिसोड पोलिसांना दिली. याबाबत माहिती अशी की रिसोड शहरातील एका शाळेत अकराव्या वर्गात शिकणारी मुलगी रिसोड शहरातील एका संगणक शिकवणी वर्गात शिकवणी करिता गेली असता शिकवणी झाल्यानंतर एक अज्ञात व्यक्ति आला व त्याने सांगितले की तुला तुझ्या मामाने बोलवले व मला सोडवीन्यास सांगितले. त्याने आपला फोन काढून मामाला बोलत असल्यांची बतावणी केली व एका ऑटोमध्ये बसवून वाशिम मार्गावर सवड शेत शिवारात एका निर्जन स्थळी नेऊन तिला चाकूचा धाक दाखवला व तिच्यावर लैंगीक अत्याचार केले. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी पीडीतेचे बयान घेणे सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

 

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.