ताज्या घडामोडी

गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवजयंती हर्ष उल्हास साजरी

AB7

गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवजयंती हर्ष उल्हास साजरी

गोंधळी समाज विकास मंडळ (महाराष्ट्र राज्य) या आपल्या सर्वांच्या संघटनेच्या वतीने बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६-०० वाजता लोकमान्य नगर जुने शहर अकोला येथील तुळजाभवानी सभागृहा समोरील प्रांगणात शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सुरुवातीला गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव पुंडलिकराव भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो व प्रतिमेचे विधीवत पूजन करून पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्या नंतर केंद्रीय कार्यकारिणीचे सर्वश्री मधुकर सोनारगण, अमोल गिते, राजेश बोटे, प्रभाकर पाचपोर, गोपाल मुदगल तसेच जिल्हा अध्यक्ष श्री राजेश पेंढारी व महिला जिल्हा अध्यक्ष सौ. दिपाताई किसनराव दोरकर यांच्यासह सर्वश्री गजानन दोरकर, मधुकर गंगावणे, प्रमोद पाचपोर, सचिन पाचपोर, मनिष अग्निहोत्री, अरुण पेंढारी, विनोद पेंढारी, राजेश माळगण, विक्की गिते, शंकर बोटे, गजानन डोंगरे, आणि परिसरातील नागरिकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो व प्रतिमेचे पूजन केले. यावेळी गजाननराव दोरकर यांनी संबळ, तुणतुण्यासह आपल्या भारदस्त आवाजात व आपल्या खास शैलीत अंगावर शहारे आणणारा पोवाडा गायला यावेळी त्यांना समाजातील उभरते कलाकार श्री नितीन किरण अलोट, मोहन संजय अलोट, नंदू गजानन पंचांगे, विनोद मुरलीधर पंचांगे यांनी साथ दिली. विशेष म्हणजे आजच्या दिवशी आमच्या संघटनेला एक महिना पूर्ण झाला असून आमचा हा पहिला वहिला कार्यक्रम आणि तो ही शिवजयंतीचा हा निव्वळ योगायोग नसून ही एक चांगली सुरुवात झाल्याची नांदी आहे असे कार्यकारिणीतील सर्वांनी बोलून दाखवित संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. संघटनेच्या वतीने केलेल्या विनंतीला मान देऊन आजच्या या कार्यक्रमाला समाज बंधू, भगिनी तसेच परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.