ताज्या घडामोडी

देवेंद्रजी, अधिवेशनापूर्वी कर्जमाफी द्या; अन्यथा घेराव घालू, ट्रॅक्टर मोर्चाद्वारे इशारा!उद्धवसेनेचा हल्लाबोल : उन्हात ट्रॅक्टर मोर्चा धडकला

AB7

देवेंद्रजी, अधिवेशनापूर्वी कर्जमाफी द्या; अन्यथा घेराव घालू, ट्रॅक्टर मोर्चाद्वारे इशारा!उद्धवसेनेचा हल्लाबोल : उन्हात ट्रॅक्टर मोर्चा धडकला

 

अकोला: विधानसभा निवडणुकीतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता स्थापनेला सहा महिन्यांचा कालावधी होऊनही मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली नाही. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास नागपूर येथे शेतकऱ्यांसह विधिमंडळात घेराव घालण्याचा इशारा उद्ध‌वसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी दिला. शुक्रवारी (दि. २) आयोजित ट्रॅक्टर मोर्चात त्यांनी सरकारवर हल्लाबोल चढविलाकर्जमाफी घोषित करण्याच्या मागणीसाठी उद्धवसेनेचे उपनेते आ. नितीन देशमुख याच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मौर्याचे आयोजन करण्यात आले होते. भर उन्हात असंख्य शेतकरी ट्रैक्टर घेऊन दाखल झाले होते. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या १७ दिवसांतच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. सरकारला शेतकऱ्यांचे परिवार उद्‌ध्वस्त करायचे नसतील तर सातबारे कोरे करावेत. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देतात, तर दूसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पठार असमर्थता दर्शवितात, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव असल्याची टीका आ. देशमुख यांनी केली.तरुणांना भरकवटण्याचा प्रयत्नशेतमालाला हमीभाव, सिंचनासाठी पुरेशी वीज, योग्य दरात खते, बी-बियाणे उपलब्ध करून देण्यापेक्षा राज्य सरकारकडून तरुणांच्या डोक्यात भगवा, हिरवा रंग टाकून मूळ मुद्द्यापासून भरकटण्याचे काम केले जात असल्याची टीका प्रहारचे सर्वेसर्वा, भाजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. शेतकन्यांच्या हितासाठी कोणत्याही पक्षाने आंदोलन केल्यास पक्षभेद विसरून त्यात सहभागी होईल. शासनाने कर्जमाफीचा निर्णय त्वरित न घेतल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला…तर आत्महत्या करावी लागेल!बाळापूर तालुक्यातील बाखराबाद या गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील श्रीमती किरण दिनेश माळी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलासह मोर्चात सहभागी झाल्या होत्या. निसर्गाची अवकृपा आणि कर्जाचा डोंगर वाढल्याने पतीने आत्महत्या केली शेतमालाला हमीभाव व खते, बियाण्यांचा काळाबाजार होऊ न देता किमती स्थिर ठेवल्यास शेतकऱ्यांना मोलाची मदत होईल. याकडे शासनाचे अजिबात लक्ष नाही. सातबारा कोरा न झाल्यास माझ्यावरही आत्महत्येची वेळ येईल, अशी भावना त्यांनी जाहीररीत्या व्यक्त केली.२rमे रोजी आयोजित मोर्चात जिल्हाप्रमुख मंगेश काळे, माजी आमदार दाळू गुरुजी, संजय गावडे, अनिरुद्ध देशमुख, महिला संघटिका सरिता वाकोडे यांनीही महायुती सरकारचा खरपूस शब्दात समाचार घेतला. यावेळी आ. देशमुख, दिलीप बोचे, विकास पागृत, ज्ञानेश्वर स्टेसने, राजेश मिश्रा यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले:

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.