ताज्या घडामोडी

कौटुंबिक वाद विकोपाला; मुलाने केली वडिलांची हत्यालोणीगुरव येथील घटना : आरोपी मुलाला पोलिसांनी केली अटक

AB7

कौटुंबिक वाद विकोपाला; मुलाने केली वडिलांची हत्यालोणीगुरव येथील घटना : आरोपी मुलाला पोलिसांनी केली अटक

खामगाव : सततच्या कौटुंबिककलहाला कंटाळून लोणी गुरव येथील २५ वर्षीय मुलाने वडिलांचा लाकडी दांड्याने अमानुष मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवार, ३० एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख धोंडोपंत हिवराळे (वय ५५, रा. लोणीगुरख) असे मृताचे नाव असून, त्यांना दारूचे व्यसन होते. ते नेहमी मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन पत्नी व घरच्यांशी वाद घालत असत. सोमवार, दि. २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ते पुन्हा नशेत घरी परतले. त्यावेळी त्यांचा मुलगा धनंजय ऊर्फ शंकर गोरख हिवराळे (वय २५) याच्याशी जोरदार वाद झाला. वाद वाढत गेल्यावर संतप्त झालेल्या धनंजयने लाकडी दांड्याने वडिलांना जबर मारहाण केली.या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे गोरख हिवराळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अरुण धोंडोपंतगोरख हिवराळेमृतकधनंजय हिवराळेआरोपीहिवराळे (रा. बोथाकाजी, ता. खामगाव) यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस उपनिरीक्षक राची पुसाम करत आहेत.पोलिस घटनास्थळीघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपासाची माहिती घेतली. यावेळी ठाणेदार चव्हाण व तपास अधिकारी उपनिरीक्षक राची पुसाम यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपी धनंजय हिवराळे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.