ताज्या घडामोडी

दारू पिण्याच्या वादावरून त्याने पत्नीच्या रक्ताने केली ‘होळी’पतीने केला लाठी-काठीने खून, २६ मार्चपर्यंत तुरुंगात, कुटंगा येथील घटना

AB7

दारू पिण्याच्या वादावरून त्याने पत्नीच्या रक्ताने केली ‘होळी’पतीने केला लाठी-काठीने खून, २६ मार्चपर्यंत तुरुंगात, कुटंगा येथील घटना

धारणी : दारू पिण्याच्या वादातूनपती-पत्नीमध्ये भांडण झाले. रागाच्याभरात पतीने लाठी-काठीने मर्मांतक वारकेल्याने तिचा मृत्यू झाला. ११ मार्च रोजीमध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.त्याचा उलगडा बुधवारी दुपारी झाला. गुरुवारी पहाटे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. न्यायालयाने आरोपीची २६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.पोलिस सूत्रांनुसार, जमुना रतन मुरले (५२) असे मृताचे, तर रतन बाबू मुरले (५५) असे आरोपी पतीचे नाव आहे. धारणीपासून ३५ किलोमीटरवरील कुटंगा गावातील हे दाम्पत्य ११ मार्च रोजी दामजीपुरा मार्गावरील लागवणीने घेतलेल्या शेतात होते. तेथे त्यांचा मुलगा रूपेश (३२) हा पत्नीसह आला होता. रतन व जमुना यांनी सवयीने मद्यपान केले. परंतु, जमुनाने आणखी मद्याची मागणी केल्याने रतनने वाद घातला. सामोपचारानंतर चौघांनी मिळूनमांसाहाराचे सेवन केले. यानंतर रूपेश पत्नीसह गावात परतला. बुधवारी सकाळी रूपेश हा शेतात गेला. त्याने वडिलांना विचारपूस केली तेव्हा आई गावात गेल्याचे सांगितले. रूपेशने गावात शोध घेतला आणि पुन्हा शेतात गेला. मात्र, रतनने जमुना ही गावात गेल्याचाच पुनरुच्चार केला. शोधाशोध घेऊन दमल्याने दुपारी रूपेश निद्राधीन झाला. सायंकाळी त्याला आई जमुनाचे धूड हे कुटंगा ते दामजीपुरा मार्गावरील रस्त्याच्या कडेला पडले असल्याची माहिती मिळाली. तिच्या अंगावर जखमा होत्या आणि शरीरातून रक्त निथळत होते. रतनने त्याला ‘और दारू पियो’ एवढेच उत्तर दिले. वडिलांनी रात्री आईसोबत भांडण उकरून काढत हत्या केल्याची रूपेशच्या एव्हाना लक्षात आले. त्यामुळे त्याने सरपंच व पोलिस पाटलांकरवी धारणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळाचा पंचानामा करून मृतदेह धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. रूपेशच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून गुरुवारी पहाटे रतनला अटक केली. पुढील तपास ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके करीत आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.