ताज्या घडामोडी

मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न न करण्याबाबतचे हमी पत्र लिहून

AB7

अकोला जिल्हातील एका गावातील बाल विवाह थाम्बविण्यास ॲसेस टु जस्टीस प्रकल्प यांना यश

अकोला : गावात अल्पवयीन मुलीचा बाल विवाह ठरवून विवाह करणार असल्याची गोपनीय माहीती प्राप्त होताच ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस टीम ने बालिकेच्या घरी भेट दिली असता मुलीच्या आजी कडून माहिती मिळाली की, मुलीचे वडील 4 वर्षांपूर्वी मरण पावले असून आई ने दुसरे लग्न केले तेव्हा पासून मुलीचे पालणपोषण आजी करत होती. परंतु घरची आर्थिक स्तिथी हलाक्याची असल्याने तसेच आजी ला पण कोणाचा आधार नसल्याने मुलीचे लग्न करण्याचा विचार केला होता. भेटी दरम्यान आजीने सांगितले. तेव्हा आजी यांची समजूत काढली व बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहीती दिली. मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न करता येत नाही असे सांगितले व मुलीला बाल कल्याण समिती अकोला यांचे समक्ष सादर करण्यात आले. बालकल्याण समितीने मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न न करण्याबाबतचे हमी पत्र लिहून घेतले त्यावेळी ग्रामविकास अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील, पोलीस यांची साक्ष घेण्यात आली. सदर बालविवाह थाम्बविन्यासाठी मार्गदर्शन बाल कल्याण समिती अकोला, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे लाभले, तसेच ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपना गजभिये, विशाल गजभिये कम्युनिटी सोशल वर्कर पूजा पवार, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील यांनी मोलाचे कार्य केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.