ताज्या घडामोडी

स्थानिक नागरिकही भरडले जाणार?तहसील कार्यालयाने जन्म दाखले रद्द करण्यासाठी पत्र दिले आहे.

AB7

‘ जन्म दाखले आणि विवाह प्रमाणपत्रे मनपा रद्द करणार!

 

अकोला : महापालिकेत जन्माची नोंद नसलेल्या नागरिकांना तहसीलदारांचे संमतीपत्र आवश्यक असायचे. त्या आधारे तहसील कार्यालयाने संमतीपत्र दिले, त्यावर हजारो नागरिकांनी महापालिकेकडून जन्म दाखले मिळविले. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे काही बांग्लादेशी नागरिकांनी भारतीय जन्म दाखले मिळविल्याचे पुरावे सादर केले. या पार्श्वभूमीवरजिल्ह्यात ५२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाने महापालिकेला पत्र पाठवून जन्म दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितले आहे.तहसील कार्यालयाच्या पत्रानुसार महापालिकेला संशयास्पद वाटत असलेल्या जन्म दाखले, विवाह दाखल्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने गत वर्षभरामध्ये दिलेले जवळपास २८०० जन्म दाखले रद्द करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासनाला आढळले की, तहसील कार्यालयाने दिलेल्या संमतीपत्रांच्या आधारे अनेक जणांनी जन्म दाखले घेतले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाने महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाला पत्र पाठवून अशा सर्व दाखल्यांचे पुनर्परीक्षण करून रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक नागरिकांचे जन्म व विवाह दाखले रद्द होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कायदेशीर उपाय शोधण्याचा सल्ला घेतला जात आहे.स्थानिक नागरिकही भरडले जाणार?तहसील कार्यालयाने जन्म दाखले रह करण्यासाठी पत्र दिले आहे. महापालिकेत जन्माची नोंद नसलेल्या तहसील कार्यालयाच्या संमती आदेशानुसार महापालिकेच्या जन्म-विभागातून जन्माचे दाखले देण्यात अ त्यामध्ये नागरिक, युवक, विद्यार्थी, महिलासुद्धा आहेत. बांग्लादेर्शीच्या बोगस प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांमुळे स्थानिकांचे जन्म दाखले रद्द होणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.