ताज्या घडामोडी

घटस्फोटासाठी दबावसासऱ्यासह दोघांकडून अर्वाच्य शिवीगाळ

AB7

विवाहितेची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी

 

सासऱ्यासह दोघांकडून अर्वाच्य शिवीगाळ घटस्फोटासाठी दबाव

 

अमरावती : शहरातील एका वैद्यकीयमहाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या ३० वर्षीय विवाहितेला पतीसह सासरच्या मंडळीकडून घटस्फोट न दिल्यास जिवे मारण्याची तसेच पहिल्या रात्रीची अंतरंग छायाचित्रे, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी विवाहितेने आधीच कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार पोलिसांत दाखल केली. धमकी मिळाल्यानंतर पुन्हा नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सासरा व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिस सूत्रांनुसार, सुरेश काशीरामजी वानखडे (५४, रा. राजाराम मेंघेनगर, कौलखेड, अकोला) व रमेश श्यामराव सुरजुसे (५८, रा. राजाराम मेंघेनगर, कौलखेड, अकोला) अशी गुन्हे दाखल झालेल्या सासरा व त्याच्या मित्राची नावे आहेत.तक्रारदार विवाहितेचा अकोलाये थील अक्षय सुरेश वानखडे याच्याशी ८ डिसेंबर २०२१ रोजी विवाह झाला. पेट्रोल पंप असलेल्या घरी नांदायला जाणार म्हणून माहेरचे सर्व जण आनंदात होते. मात्र, पतीसह सासू-सासरे, दीर-नणंद यांच्या कौटुंबिक हिंसाचाराचा जाच तिला सहन करावा लागला. त्यातच अमरावती येथे नोकरीच्या ठिकाणी राहणेदेखील त्यांना सहन होत नव्हते. जाच असह्य झाल्यावर विवाहितेने सासरच्या मंडळीविरुद्ध नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.नांदगाव पेठ पोलिसात २५ एप्रिल रोजी दोघांविरुद्ध गुन्हे यापूर्वीही सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रारदरम्यान, २१ एप्रिल रोजी विवाहिता तिचे काका व मैत्रिणीसोबत असताना तिला रमेश सुरजुसे याचा मोबाइलवर कॉल आला. वानखडे कुटुंबाला नोटीस दिल्याबद्दल त्याने अर्वाच्य शिवीगाळ करीत तिचा पाणउतारा केला. यानंतर सासरा सुरेशने कॉल केला. घटस्फोट न दिल्यास तुझ्या पतीने काढलेली पहिल्या रात्रीची अंतरंग छायाचित्रे, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. एवढेच नव्हे तर गुंडांच्या मदतीने संपविण्याची धमकी अक्षयनेदेखील दिल्याचे तो यावेळी म्हणाला. यामुळे हादरलेल्या विवाहितेने नांदगावपेठ पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.