ताज्या घडामोडी

 १५ रुपयांवरून ५० रुपये दैनंदिन बाजार शुल्क!उत्पन्नवाढीसाठी महापालिकेचा प्रयत्न : वसुलीसाठी निविदा

AB7

१५ रुपयांवरून ५० रुपये दैनंदिन बाजार शुल्क!उत्पन्नवाढीसाठी महापालिकेचा प्रयत्न : वसुलीसाठी निविदा बोलाविणा

अकोला: महापालिका प्रशासनानेदैनंदिन बाजार वसुली शुल्क वाढवण्याचा विचार सुरू केला असून, उत्पन्नवाढीसाठी महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. शहरातील फेरीवाले, लघु व्यावसायिक, मनपाच्या जागेवर हातगाडी, स्टॉल टाकून व्यवसाय करणाऱ्यांकडून १५ ते २० बाजार शुल्क घेतल्या जात होते. ते आता ५० रुपये करण्याचा महापालिकेचा विचार दिसत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन बाजार वसुलीचा कंत्राट देणार असून, लवकरच निविदा प्रसिद्ध करणार आहे.महापालिकेला यातून उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. अनेक वर्षापासून शुल्कात वाढ करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या गंगाजळीत फारसी वाढ दिसत नव्हती. दैनंदिन बाजार शुल्क वाढविल्यावर महापालिकेला तब्बल २ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. बाजार वसुलीचे काम सध्या ९ कर्मचारी करत असल्याने त्यातही वाढ करण्याची मागणी होत आहे.शुल्क वाढ कशी असेल ?खाली बसून व्यवसाय करणारे १ व्यावसायिक – १५ ऐवजी २० रुपये प्रति दिवसचारचाकी गाडीतून व्यवसाय 3 करणारे व्यावसायिक – २० रुपयांऐवजी ५० रुपये प्रति दिवसजागेनुसार शुल्क आकारण्व्यवसायासाठी मोठी जागा व्यापणाऱ्या व्यावसायिकांसाठी वेगळे दर लागू करण्यात येणार आहेत. ८x८ चौरस फू जागेसाठी – ३० रुपये तर अधिक जाग व्यापणाऱ्या व्यवसायांसाठी ३०, ६० आणि ९० रुपये असे टप्प्याटप्याने शुल्क लागू करण्यात येणार आहे. महापालिकेला दैनंदिन बाजार शुल्कातून सध्या सुमारे १ कोटी रुपये महसूल प्राप्त होतो. शुल्क दुप्पट केल्याने महसूल वाढून २ कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.