ताज्या घडामोडी

लोककलेला राजाश्रय द्या; अटी शर्ती न ठेवता सर्व कलावंतांना मानधन मिळावे – राष्ट्रीय लोक कलावंत समितीची मागणी.

AB7

लोककलेला राजाश्रय द्या; अटी शर्ती न ठेवता सर्व कलावंतांना मानधन मिळावे – राष्ट्रीय लोक कलावंत समितीची मागणी.

मेहकर : १० मार्च रोजीराष्ट्रीय लोककलावंत, दिव्यांग, निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे वतीने ग्रामीण भागातील शोषित, पीडित उपेक्षित लोककलाकार कवी, गायक, साहित्यिक, वादक अभिनेते नाटककार निर्माता दिग्दर्शक कॅमेरा मॅन, तमाशा कलावंत वाघे मुरळी, बहुरूपी शास्त्रीय सुगम संगीत, संगीत विशारद ऑर्केस्ट्रा कलाकार , लावणी, डान्सर, कथक नृत्यांगना, ह.भ.प. कीर्तनकार, वारकरी सर्व प्रकारचे भजनी मंडळी, कलावंत गायक मंडळ ब्रास बँड वादक, बँजो पार्टी कलावंत, संबळ,

 

सनई, वादक वासुदेव पांगुळ, नंदीबैलवाले भारुड शाहिरी पोवाडे कलाकार, तृतीय पंथी

 

डांसर इत्यादी लोककलावंत असून सदर लोक कलावंत हे सामाजिक समता व बांधिलकी जपणारी असून

 

सदर कलावंतांना शासनाकडून वृद्ध मानधन मिळत असते. परंतु सदर मानधन मिळत असणाऱ्या

 

काही जाचक अटीमुळे यातील काही कलाकारांना या वयोवृद्ध मानधनाचा लाभ घेता येत नाही तसेच लोककलावंतांना उपासमारीची वेळ येत आहे ह्या डिजिटल जमान्यांमध्ये लोक कलावंताची कला ही लोप पावत चाललो आहे. तरी वृद्ध कलावंत मानधन घेण्यासाठी काही खूप जाचक अटी मुळे लोककलावंतांना वृद्ध कलावंत मानधनासाठी अर्ज करीत असताना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय लोक कलावंत, दिव्यांग, निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप बोरकर, उपाध्यक्ष दुर्गादास श्रीराम काटे (गोंधळी महाराज), सचिव सतीश अर्जुन

 

बोरकर, समितीचे मार्गदर्शक ह. भप ज्ञानेश्वर तायडे महाराज शाहीर जगदीश बोरकर, विधी सल्लागार एडवोकेट राजेश दाभाडे, एडवोकेट माधव घोडे, एडवोकेट ओम भालेराव, त्याचप्रमाणे सुनील तुकाराम पवार, शिवाजी काटे, मंगेश वानखेडे यांनी निवेदन दिले. असून महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या या लोककलावंतांना महाराष्ट्र शासनाने राज्यश्रय द्यावा, सर्व कलावंतांना कलावंत मानधन या योजनेमध्ये सामावून घ्यावे. जाचक अटी रद्द कराव्या. अशा विविध मागणीसाठी राष्ट्रीय लोक कलावंत संघर्ष समितीने गटविकास अधिकारी, तहसीलदार मेहकर यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.