ताज्या घडामोडी

जुने शहरात शिवजयंतीसाठी साकारला प्रतापगड!जय बाभळेश्वर शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन

AB7

 

जुने शहरात शिवजयंतीसाठी साकारला प्रतापगड!जय बाभळेश्वर शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन

अकोला: जुने शहरातील रेणुकानगरमध्ये येत्या १७ मार्च रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त परिसरात प्रतापगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. दि. १८ ते १८ मार्च अशा तीन दिवसीय उत्सवात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जुने शहरातील डाबकी रोड परिसरात मागील ३० वर्षांपासून जय बाभळांवर सार्वजनिक शिवजयंती अलरव समितीकडून शिवजयंती उत्सव मोठ्चा उत्साहात साजरा केला जातो. यंदाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे ३१ वे वर्ष असून, १७ मार्च रोजी जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शिवरायांचे मूर्तीपूजन केले जाईल ८:३० वाजता मिरवणुकीला प्रारंभ होऊन डाबकी रोड मार्गे राजकमल हॉटेल ते कस्तुरबा गांधी रुग्णालयामागील छत्रपती शिवा महाराज नगरस्थित शिवरायांच्या प्रतिमेसमोर रात्री १० वाजता मिरवणुकीची सांगता होणार आहे. मिरवणुकीपूर्वी विविध क्षेत्रांत सामाजिक दायित्व निभावणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, माजी नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती व सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांची उपस्थिती राहणार आहे. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.१६ मार्च रोजी मशाल यात्राशिवरायांच्या जयंतीनिमित्त १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता लहान मुली, तरुणी व महिलांच्या उपस्थितीत मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी नगरस्थित वाल्मिकी चौकातील तुळजाभवानी माता मंदिरातून मशाल यात्रेला प्रारंभ होईल. डाबकी रोड येथून पायी निघालेल्या मशाल यात्रेचा समारोप रेणुका नगर येथे उभारलेल्या प्रतापगड किल्ल्यावर होईल. पाठिकाणी सामूहिक शिवप्रार्थनेचे वाचन व शिवरायांची आरती केली जाईल.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.