आपला जिल्हाक्राईम स्टोरीमहाराष्ट्र

श्रीमंत महिलांना प्रोटीन शेकमध्ये नशेच्या गोळ्या देऊन ब्लॅकमेल करत होता जिम ट्रेनर, 11 महिलांच्या संपर्कात

एकता गुप्ता ही रोज ग्रीन पार्कमध्ये असलेल्या जिममध्ये जात होती. नेहमीप्रमाणे 24 जून रोजी सकाळी ती जिममध्ये गेली. त्यानंतर परत आलीच नाही. तिचा तपास लागला नाही. यामुळे तिच्या कुटुंबियांनी पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दाद मागितली.

एका विवाहीत महिलेच्या हत्या प्रकरणात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कानपूरमधील एकता गुप्ता हत्या प्रकरणाचे राज चार महिन्यांनी समोर आले आहे. या प्रकरणात जिम ट्रेनर विमल सोनी याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि कॉल डिटेल्स समोर आले आहे. त्यानुसार, प्रशिक्षणादरम्यान तो श्रीमंत महिलांच्या जवळ जात होता. त्यामुळे अनेक महिलांनी विमलच्या आर्थिक गरजाही पूर्ण केल्या. प्रोटीन शेकमध्ये नशेच्या गोळ्या टाकून तो महिलांना ब्लॅकमेल करत होता. 11 महिला त्याच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे.

एकता  प्रकरणात जिम ट्रेनर विमल सोनी आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचे मोबाईल फोनचे कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) काढले. त्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट काढले. त्यातून तो महिलांशी अश्लील चॅटींग करत असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात तो एनर्जी ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या देत होता. तो महिलांना ‘सप्लिमेंट’ म्हणजे जिममध्ये एनर्जी ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या टाकून देत होता. त्यानंतर काही महिलांना नशेची सवय लागली. त्या त्याच्या संपर्कात आल्या.

सिव्हिल लाइन्सच्या गोपाल विहारमध्ये राहणारी एकता गुप्ता ही रोज ग्रीन पार्कमध्ये असलेल्या जिममध्ये जात होती. नेहमीप्रमाणे 24 जून रोजी सकाळी ती जिममध्ये गेली. त्यानंतर परत आलीच नाही. तिचा तपास लागला नाही. यामुळे तिच्या कुटुंबियांनी पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दाद मागितली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. तब्बल चार महिन्यांनंतर शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी विमल सोनी याला अटक करण्यात आली. त्यानंतर या हत्येचे गुपित उघड झाले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.