ताज्या घडामोडी

आ. साजिद खान यांनी घेतली मनपा अधिकाऱ्यांची बैठक 

AB7

रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना त्रास होता कामा नये . मा  साजिद खान यांनी घेतली मनपा अधिकाऱ्यांची बैठक

 

अकोला : येत्या २ मार्च पासून पवित्र रमजान महिना सुरू होत असून त्यापूर्वी ईदगाह परिसराची स्वच्छता, रंग रंगोटी, डागडुजी, पथदिवे, स्वच्छ पाणी, नियमित पाणी पुरवठा, मुस्लिम बहुल परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे तसेच जोडरस्त्याची दुरुस्ती करणे यांसह विविध सूचना गुरुवारी आ. साजिद खान यांनी मनपा अधिकारी वर्गाच्या घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी माजी नगरसेवक मोहम्मद इरफान, पराग कांबळे उपस्थित होते.

शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्या सुद्धा मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहे परिणामी मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. येत्या २ मार्च पासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे त्यापूर्वी शहरातील सर्व ईदगाह परिसराची स्वच्छता करीत रंगरंगोटी व अन्य मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात याव्या. शहरातील मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये साफसफाई, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी, बंद असलेले पथदिवे बसविण्यात यावे, नियमित पणे स्वच्छ पाणी पुरवठा, ज्या भागात झाडे झुडपे वाढली आहेत त्याची छाटणी करणे, अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्या असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे, परिणामी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नाल्या सफाई करणे, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे असे निर्देश आ. साजिद खान यांनी मनपा अधिकारी वर्गाच्या घेतलेल्या आढावा बैठकीत दिले. यावेळी शहरात ज्या ठिकाणी पथदिवे बंद आहेत अशी पथदिवे काढून नवीन पथदिवे लावण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश सुद्धा यावेळी आ. पठाण यांनी दिले. इदगाह ला जोडरस्ता म्हणून जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करीत रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याचे आदेशित केले. या आढावा बैठकीला झोन अधिकारी विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, दिलीप जाधव, अमोल डोईफोडे, गजानन घोंगे, आरोग्य व स्वच्छता अधिकारी संजय खोसे, अतिक्रमण विभाग अधिकारी चंदू इंगळे, मिश्रा आदी उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.