ताज्या घडामोडी

चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

AB7, कविता वाघ चाळीसगाव प्रतिनिधी

चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

 

चाळीसगाव : चाळीसगाव-छत्रपतीसंभाजीनगर या रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी दिल्ली रेल्वेबोर्डाच्या गतीशक्ती विभागाचे निर्देशक अभिषेक जगावत यांनी जारी केले आहे. सर्वेक्षणासाठी ८ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गामुळे दक्षिण आणि उत्तर भारत जोडला जाणार आहे.छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगावमार्गे उत्तरेकडे जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा असून मध्ये आठ किमीचा अवघड वळणाचा औट्रम (कन्नड) घाट आहे. याच घाटमार्गामुळे छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव यादरम्यान वाहतुकीचा प्रश्न जटील झाला आहे. गेल्या वर्षभरापासून घाटातील अवजड वाहनांची वाहतूक औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये बंद आहे. याबाबत खंडपीठात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाटात बोगदा करण्याचा प्रस्ताव स्विकारला आहे.मराठवाड्यातून खान्देशात दरदिवशी १० हजार प्रवासीचाळीसगाव – छत्रपती संभाजी नगर रेल्वेमार्गामुळे प्रवाश्यांची मोठी सोय होणार असली तरी, भारतातील दक्षिण -उत्तर व्यापाऱ्यालाही हा मार्ग वरदान ठरणार आहे. खान्देशातून मराठवाड्यात दरदिवशी १० हजार नागरिक प्रवास करतात. रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वेच्या गतीशक्ती विभागाकडून निधी मंजूर केला गेला आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ५० टक्के तर ५० टक्के निधी राज्य शासनातर्फे उपलब्ध करुन दिला जाणार आहेछत्रपती संभाजीनगर -चाळीसगाव रेल्वेमार्गामुळे दक्षिण व उत्तर या दोन दिशा जोडल्या जाणार आहे. यामुळे या दोन्ही भागांना विकासाची नवी संधी मिळेल. प्रवाश्यांसाठी तर ही आनंदवार्ताच आहे. सर्वेक्षणाच्या कामावर पंतप्रधान कार्यालयाकडून देखरेख केली जाणार आहे.

 

-अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती, संभाजीनगर

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.