अकोला
शासकीय यंत्रणेच्या तांत्रिक चुकांसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नका , वसुलीसाठी मुदतवाढ द्या किंवा अन्य अनुदानातून रक्कम कपात करा, शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याची नाहक कारवाई करु नये.. चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी. आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे यांनी केली. ,सन 2022 मधे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सन २०२३ मधे शासकीय आर्थिक मदतीची रक्कम वितरित करताना यंत्रणेतील तांत्रिक दोष कारणांमुळे काही शेतकऱ्यांना दुबार अनुदान प्राप्त वितरित झाले आहे. त्यामुळे अधिकच्या रकमेची वसुली करणेबाबत शासनाकडून क्षेत्रिय अधिका-यांना सूचना प्राप्त आहेत, त्यानुसार तहसीलदार तेल्हारा यांनी वसुलीसाठी नोटीस संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत, त्यातील काही शेतकऱ्यांनी रकमेचा भरणा देखील केलेला आहे , परंतु यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन आणि इतर पिकांची हानी झाल्याने शेतकरी आर्थिक द्रुष्टीने कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना रक्कम भरणे शक्य नसल्याने वसुलीच्या कार्यवाहीसाठी अशा शेतकऱ्यांनी मुदत वाढ मागीतली आहे, त्यांना मुदतवाढ देण्यात यावी . तसेच अनुदानामध्ये रक्कम कपात करण्यात यावी त्यांच्याकडून कोणतेही प्रकारची शक्तीची वसुली करू नये असे निवेदन मुख्यमंत्री कृषिमंत्री यांच्याकडे खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहावे व शेतकऱ्याला सहकार्याची भूमिका घेत असताना अशा पद्धतीने कारवाई करू नये शासनाच्या चुकीचा ,भुदंड शेतकरी राजाला होता कामा नये यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.