सामाजिक

मन सुन्न करणारी घटना, हॉस्पिटलध्ये लहान मुलांच्या वॉर्डमध्ये अग्तिनतांडव, 10 बालकांचा मृत्यू

एका हॉस्पिटलच्या NICU विभागात शुक्रवारी रात्री भीषण आग भडकली. या दुर्घटनेत 10 लहान मुलांचा मृत्यू झाला असून 16 मुलं जखमी झाली आहेत. NICU हा लहान मुलांचा वॉर्ड आहे.

महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली. या आगीत होरपळून 10 मुलांचा मृत्यू झाला आहे, 16 जखमी झालेत. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजच्या NICU मध्ये शुक्रवार रात्री 10.45 च्या सुमारास ही आग लागली. जिल्हाधिकारी (डीएम) अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये हे हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असं डीएमने सांगितलं. चिंताजनक प्रकृती असलेल्या बालकांना NICU मध्ये ठेवलं जातं. NICU च्या अंतर्गत विभागात 30 मुलं होती. त्यातील बहुतांश बालकांना वाचवलं असं झांसीचे कमिश्नर बिमल कुमार दुबे यांनी सांगितलं. झांसीचे वरिष्ठ पुलिस अधिक्षक (एसएसपी) सुधा सिंह यांनी सांगितलं की, 16 मुलांवर उपचार सुरु आहेत. घटनेच्यावेळी NICU मध्ये 50 पेक्षा जास्ता मुलं होती.

झांसीच्या जवळ असलेल्या महोबा जिल्ह्यातील एका जोडप्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 13 नोव्हेंबरला सकाळी 8 च्या सुमारास या जोडप्याच्या आयुष्यात एका गोंडस बाळाच आगमन झालं होतं. पण आता त्यांच्या आयुष्यात दु:ख आहे. आगीमध्ये होरपळून त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार कसे मिळतील, ते सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. झांसी जिल्ह्यातील मेडीकल कॉलेडमधील ही दुर्घटना दु:खद आणि ह्दयद्रावक असल्याच योगींनी म्हटलं आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना केलीय.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.