अर्थकारण

सोने 45 वर्षांनंतर दराचा विक्रम मोडणार, यंदा 41 वेळा ऑल टाइम हाय, तेजी 34 टक्के, कुठपर्यंत वाढणार सोन्याचे दर

एससीएक्सवर गुरुवारी डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोने 13 रुपयांच्या किंचित वाढीसह 78443.00 रुपयांवर बंद झाले. दिवाळीच्या एक दिवस आधी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली.

सोन्याच्या दराने नवीन उच्चांक निर्माण केला आहे. यंदा सोन्याच्या दरात 34 टक्के तेजी आली आहे. 1995 नंतर सोन्याच्या किंमतीत सर्वाधिक तेजी आली आहे. या वर्षी सोने 41 वेळा ऑल टाइम हायवर पोहचले आहे. यापूर्वी 2011 मध्ये सोने 34 वेळा ऑल टाइम हायवर गेले होते. इतिहासात प्रथमच सोन्याची किंमत 2,800 डॉलर प्रती औंस झाली आहे. महागाईचा विचार केल्यास सोने 1970 नंतर सर्वोत्तम पातळीवर पोहचले आहे. तसेच 1979 नंतर सोन्याचे दर उच्चांक पातळीकडे जात आहे. 45 वर्षांपूर्वी सोने 120 टक्के वाढले होते.

अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीत अनिश्चिता निर्माण झाली आहे. तसेच पश्चिम आशियामध्ये संकट आहे. युक्रेन-रशिया तणाव आणि इस्त्रायल-इराण ताणवाचा परिणामामुळे सोन्याचे दर  वाढले आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अमेरिकेतील निवडणुकीनंतर सोन्याच्या दराची वाटचाल कशी राहणार? हे स्पष्ट होणार आहे. तसेच भारतात दिवाळी आणि लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. भारतीय लोकांमध्ये सोने खरेदीची परंपरा जुन्या काळापासून आहे. त्यामुळे सण आणि लग्नसराईत सोन्याची मागणी वाढलेली असते.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याचे दर मध्यम कालावधीसाठी प्रति 10 ग्रॅमसाठी 81,000 रुपये असणार आहे. दीर्घ कालावधीसाठी हे दर 86,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. कॉमेक्सवर  मध्यम अवधीसाठी 2,830 डॉलर आणि दीर्घ कालावधीसाठी 3,000 डॉलरवर पोहचणार आहे. सोने सध्याच्या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी करणारे एसेट्स बनले आहे. यंदा सोन्याच्या किंमती कॉमेक्स आणि घरगुती बाजारात विक्रमी पातळीवर पोहचल्या आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.