ताज्या घडामोडी

शिकायचे होते, पण लग्न लावून दिले; आईसह मुलीचा एकाच दोरीने गळफासतुळजापुरात मुख्याध्यापकाच्या घरातील हृदयद्रावक घटना

AB7, वैभव पारस्कर

शिकायचे होते, पण लग्न लावून दिले; आईसह मुलीचा एकाच दोरीने गळफासतुळजापुरात मुख्याध्यापकाच्या घरातील हृदयद्रावक घटना

तुळजापूर (जि. धाराशिव) : शिक्षककुटुंबातील एका विवाहित मुलीसह तिच्या आईने एकाच दोरीला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना तुळजापूर शहरात मंगळवारी उशिरा उघडकीस आली. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात मुलीचे शिक्षण थांबवून शेतकरी तरुणासोबत विवाह लावून दिल्याची खंत व्यक्त केल्याची माहिती तुळजापूर पोलिसांनी दिली.तुळजापूर येथील लिटिल फ्लॉवर्स शाळेत मुख्याध्यापक असलेले संजय पवार हे मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेले. यानंतर त्यांच्या गवते प्लॉटिंग येथील घरी पत्नी रत्नमाला पवार आणि विवाहित मुलगी प्रतीक्षा पाटील यांनी एकाच दोरीला गळफास घेतला. हा प्रकार दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. रात्री ९:३० वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.कारणांचा उल्लेख करताना लिहिले…घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये प्रतीक्षा पाटील हिला पुढील शिक्षण घ्यायचे होते. मात्र, शिक्षण बंद करून तिचा विवाह शेतकरी मुलासोबत लावून देण्यात आल्याची खंत व्यक्त करत आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.आत्महत्येपूर्वी घराची चावी शेजाऱ्याकडे…आत्महत्या करण्यापूर्वी रत्नमाला पवार आणि प्रतीक्षा पाटील यांनी आपल्या घराचा दरवाजा बंद न करता तो पुढे लोटून दुसऱ्या गेटला कुलूप लावून शेजाऱ्यांना चावी दिली.आपण बाहेर जातोय, असे सांगत पुढे केलेल्या दुसऱ्या दरवाजाने घरात प्रवेश केला व एकाच दोरीने माय-लेकीने गळफास घेतला.मृत मुलीची शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, इच्छेविरुद्ध घडल्याने ती नैराश्यात होती, असे स्पष्ट होते.प्रतीक्षा पाटील (वय २३) हिचा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तालुक्यातील सापटणे येथील एका शेतकरी तरुणाशी वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.