ताज्या घडामोडी

पतीचा खून करणारी पत्नी वारसदार होऊ शकत नाही दिवाणी न्या. अविनाश गोरे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

AB7

पतीचा खून करणारी पत्नी वारसदार होऊ शकत नाहीदिवाणी न्या. अविनाश गोरे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

नांदेड : पतीच्या नैसर्गिक किंवा अकाली निधनानंतर पत्नीच त्याची पहिली वारसदार असते. परंतु पतीचा पत्नीने खून केल्यास किंवा खुनासाठी प्रोत्साहन दिल्यास ती पत्नी वारसदार होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिवाणी न्या. अविनाश गोरे यांनी दिला. तसेच मयताचा मुलगा आणि दोन्ही मुलींच्या हक्कात वारसा प्रमाणपत्र दिले.खेमसिंग पूजारी यांचा १४ ऑगस्ट २०२४ रोजी खून झाला होता. खेमसिंग यांच्या खुनाच्या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात खेमसिंगच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच खेमसिंग यांचा मुलगा बेद्राजसिंग आणि मुली गुरप्रीत कौर आणि हरविंदर कौर यांनी वारसा प्रमाणपत्र मिळाले म्हणून न्यायालयात अर्ज केला होता. सदरील प्रकरणात मयताची पत्नीनेही न्यायालयात हजरहोऊन वारसा प्रमाणपत्र मिळावे म्हणून जबाब दाखल केला. त्यानंतर खेमसिंग यांची मुले बेद्राजसिंग, गुरप्रीत कौर व हरविंदर कौर यांच्या वतीने अॅड. शिवराज पाटील न्यायालयात बाजू मांडली. जर पत्नीने पतीचा खून केला असेल किंवा खून करण्यास प्रोत्साहन दिले तर तिला हिंदू उत्तराधिकारी कायदा कलम २५ नुसार पतीचे वारस प्रमाणपत्र मिळण्यास अपात्र ठरते.१४ऑगस्ट २०२४ रोजी झाली होती खूनाची घटनातसेच साक्षी पुरावा म्हणून खेमसिंग यांच्या खून प्रकरणात त्यांच्या पत्नीवर दाखल असलेल्या एफआयआरची प्रत दिली. न्या. अविनाश गोरे यांनी साक्षी पुरावे तपासून व युक्तिवाद ऐकून पत्नी ही वारसदार होऊ शकत नाही असा आदेश दिला. अॅड. पाटील यांना अॅड. तापडिया, अॅड. प्रियंका कैवारे, अॅड. सचिन दवणे, अॅड. सुनील खंदारे यांनी मदत के

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.