ताज्या घडामोडी

राज्यातील नागरिक विजबील मुक्त होणार

AB7

राज्यातील नागरिक विजबील मुक्त होणार

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील वीज ■ ग्राहकांसाठी योजना जाहीर ■ करण्यात आली असून, यातून लाखो वीज ग्राहकांना वीज – बिलमुक्ती मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन वीज धोरणांतर्गत स्मार्ट मीटर बसवणा-या ग्राहकांना व जे दिवसा वीज वापरतील त्यांना 10 टक्के वीज दरात सवलत दिली जाणार आहे.

हे ग्राहक आपल्या विजेच्या वापरावर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकतील आणि यामुळे राज्याच्या ऊर्जा बचतीला हातभार ■ लागेल. जी वीज आपल्याला 8 रुपयांना पडत होती ती आता केवळ 3 रुपयांना पडणार आहे, म्हणजे यूनिटमागे 5 रुपये आपण वाचवत आहोत. याचा जवळपास 70 टक्के ग्राहकांना थेट फायदा होणार असल्याचेही फडणवीस ■यांनी म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील 70 टक्के ग्राहक हे ० ते100 युनिट वीज वापरणारे आहेत. सरकारच्या नव्या योजनेनुसार, या ग्राहकांना सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत वीज मोफत मिळणार आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे, ज्यामुळे दीड कोटी ग्राहकांना विजेबिलाचा भार सहन करावा लागणार नाही.बळीराजा मोफत वीज योजनामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, बळीराजा मोफत वीज योजना लागू करण्यात आली असून याचा फायदा तब्बल 45लाख कृषी पंपधारकांना होणार आहे. या योजनेसाठी सरकारने 14 हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. यामध्ये शासनाच्या सबसिडीची 5,500 कोटींची बचत होणार आहे आणि एकूण वीज खरेदी खर्चात 10 हजार कोटी रुपयांची बचत या माध्यमातून होणार आहे. या योजनेमुळे कार्बन उत्सर्जनात 25 टक्यांची कपात होणार आहे. मुख्यमंत्री कृषी वाहिनी प्रकल्पाअंतर्गत, 2026 पर्यंत शेतक-यांना संपूर्ण सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा केला जाणार आहे. यामुळे शेतक-यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असून विजेच्या किमतीत मोठी कपात होईल.


 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.